धाराशिव – जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला. अशा कठीण प्रसंगात, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या तत्परतेने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी थेट सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावले. या सैन्य दलाचा हेलिकॉप्टर द्वारे अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या फेसबुकवरती पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लाखी तालुका, परंडा – अतिवृष्टीमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे यश, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले आहे.
दरम्यान , आणखी जर काही ठिकाणी असे नागरिक अडकले असतील तर तात्काळ संपर्क करावा असे आव्हान देखील ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.
या प्रयत्नात तात्काळ सहकार्य लाभलेल्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याचे व हेलिकॅप्टर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन देखील ओमराजे निंबाळकर यांनी केले आहेत.










