• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “सत्ता ही अंतिम ध्येय नसते; पक्षाची एकजूट आणि विचारसरणी याहून मोठी असते. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.


नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढील सत्तास्थापनेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला.
“स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून जाणीवपूर्वक पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही तथाकथित स्वयंघोषित नेते माध्यमांमधून खोटा नैरेटिव्ह तयार करत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.


यावेळी त्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मात्र हा केवळ राजकीय डाव आहे. आमच्यात कोणताही मतभेद नाही,” असे ते म्हणाले.


पुढे बोलताना त्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. “आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना किंवा दबावाला आम्ही बळी पडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढील रणनीतीबाबतही संकेत दिले.

“या अधिवेशनादरम्यान मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनिता ताई पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती निश्चित करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरनाईक यांनी तथाकथित बोलघेवड्या स्वयंभू नेत्यांना थेट इशारा देत सांगितले की, “पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय कोणीही पुढील रणनीतीबाबत भाष्य करू नये. पक्षशिस्त सर्वांसाठी समान आहे. अनुशासन भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”


“सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड करणार नाही. दबाव, आमिष, अफवा किंवा राजकीय प्रलोभनांच्या आधारावर शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसैनिकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, संघटन अधिक बळकट करावे आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करत सरनाईक यांनी आगामी काळात शिवसेना अधिक संघटित, सक्षम आणि प्रभावीपणे उभी राहील, असा निर्धार व्यक्त केला.


दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आले असून, सत्तास्थापनेबाबतचे पुढील निर्णय आणि संभाव्य राजकीय घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

Next Post

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share