• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता नगर येथे अगदी रस्त्यावर सांडपाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे ये-जा करणे कठीण झाले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. समता नगरमधील बी अँड सी च्या लगत असलेल्या रस्त्यावर संडासचे पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. या पाण्यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर येत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष फटका बसत आहे.



साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
नगरपरिषद प्रशासनाने “100 दिवसांत शहर स्वच्छ करण्याचा निर्धार” जाहीर केला होता. मात्र, 100 दिवस उलटूनही समता नगरमधील सद्यस्थिती पाहता हा दावा फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कामात मोठी तफावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


समता नगरसारख्या शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या भागात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत आहे.



नगरपरिषदेचे पदाधिकारी विविध विकासकामांच्या वेळी सोशल मीडियावर रील्समध्ये दिसतात; मात्र या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे. “प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी संबंधितांनी या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिकांच्या मते, केवळ आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाहीत. संडासच्या पाण्याचा योग्य निचरा, गटार व्यवस्थेची दुरुस्ती आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

Next Post

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share