हॅलो धाराशिव; धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपले पालकत्व निभावत जिल्हावासियांच्या मदतीला धाव घेतली आहे. जनतेच्या अडचणींना वेळीच प्रतिसाद देणारे आणि प्रशासनाला सतत सजग ठेवणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अल्पावधीतच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विकासकामांना गती देण्याचे काम केले. फक्त विकास नव्हे, तर संकटाच्या काळातही त्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांनी मदतीचे निर्णय तातडीने घेतले.
अनेक शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबांना त्यांनी तत्काळ आर्थिक मदतीचा हात दिला. अशा कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत देऊन त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असो, पुरग्रस्त गावांमध्ये अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करणे असो – प्रत्येक वेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचा मानवी दृष्टिकोन दाखवला. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांनी मदतीचे निर्णय तातडीने घेतले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर अनेक गावांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला मदत तातडीने पोहोचविण्याचे आदेश दिले.
राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची वृत्ती
त्याचबरोबर, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांमध्येही त्यांनी ठोस उपक्रम राबवले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी वाढाव्यात आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी सरनाईक प्रयत्नशील आहेत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची वृत्ती आणि प्रत्येक समस्येकडे संवेदनशीलतेने पाहण्याची त्यांची शैली यामुळे ते जिल्ह्यातील जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब पूरग्रस्तांसोबत केली दिवाळी साजरा
धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदाची दिवाळी पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. या दौऱ्यात ते पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहोपयोगी साहित्य आणि फराळ वाटप करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न सरनाईक यांच्याकडून करण्यात आला. गेल्या महिन्यात भूम, परंडा, कळंब भागात आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ते स्वतः कुटुंबीयांसह तिथे हजर राहिले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिले.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाच लाखाची मदत
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गावातील एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्या तरुणाच्या पाठीमागे त्याचे कुटुंब एकटे पडले होते. पत्नी सह तीन चिमुकल्यांचा संसार उघड्यावर पडलेल्या अवस्थेत असताना पालकमंत्री हे त्यांचे भाऊ बनून आले आणि त्यांना पाच लाख रुपयाची मदत केली. वैयक्तिक स्वरूपात पाच लाखाची मदत आणि घर बांधून देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!
आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून नेले होते. मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यांत पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली.











