• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


धाराशिव ता 27: जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत तुळजापूर तालुक्यातील शहापूर निलेगाव गुजनूर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट, जळकोटवाडी येथे तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आज गणेशाच आगमण होत असल्याने विघ्नहर्ता गणेशाकडे आमदार पाटील यांनी सरकारला सु्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. एवढं नुकसान होऊनही सरकारचा प्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असेल तर शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये सरासरी 257 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात नळदुर्ग महसुली मंडळामध्ये 316 मिमी, जळकोट 252 मिमी  पाऊस पडून अतिवृष्टी झालेली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.  त्यामुळे  सर्वच पिकांचे  50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत,एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी सर्वस्वी या सरकारची व प्रशासनाची असणार आहे. त्यामुळे गणराया या सरकारच्या लोकांना व प्रशासनास बळीराजांच्या पाठीशी राहण्याची सु्बुद्धी दे अशी प्रार्थना आमदार पाटील यांनी केली आहे.

Previous Post

धाराशिव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची धाड

धाराशिव शहर पोलीस प्रमुखाचे हाताची घडी तोंडावर बोट !

Next Post

“नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ, सुंदर आणि सुबक धाराशिव घडविण्याचा संकल्प” –  नीता अंधारे 

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Next Post

“नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ, सुंदर आणि सुबक धाराशिव घडविण्याचा संकल्प” –  नीता अंधारे 

"आरक्षण मिळून १२ तास उलटले, ओमराजे यांना आनंद झाला नाही"? कार्टूनच्या माध्यमातून भाजप पदाधिकाऱ्याची खासदारांवर टीका

मराठा आरक्षणाच्या विजयाचे श्रेय घेता येत नसल्याने तुमच्या पोटात मळमळ होतेय, कार्टूनच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांवर पतंगेंची सडकून टीका

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share