धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तुळजाभवानी फेस्टिवलमध्ये जिल्हाधिकारी पुजार यांनी डान्स केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होऊ लागली आहे. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले असून , जिल्हाधिकारी यांना यांना आहे का नाही? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून जनावरे दगावली आहेत. शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले आहेत. सरकारी पंचनामे न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या या कृतीमुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या वायरल झालेल्या डान्सवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे अतिशय असंवेदनशीलतेच लक्ष नाही. याची निषेध करावा तेवढा कमी आहे. असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा महोत्सव रद्द करून त्याच्यातून होणारा खर्च पूरग्रस्तांना द्या अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या वर्तनावर काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
हे अतिशय असंवेदनशीलतेच लक्ष नाही. याची निषेध करावा तेवढा कमी आहे. असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. आज आपण पाहिलं असेल धाराशिव आणि त्याच्या शेजारी जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. गेल्या शंभर वर्षापासून अशा पद्धतीने पावसामुळे नुकसान कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याची जमीन, पीक सर्वच वाहून गेल आहे. शेतकऱ्याच्या घरात चिखल झाला आहे. त्याची सध्याची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. शेतकरी अतिशय चिंतेत आहे. शिक्षणासाठी, शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं याच्या चिंतेत तो आहे. अशा स्थितीमध्ये भूम तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे. आपण त्याला आधार देणे गरजेचे आहे. मात्र अशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन हे अतिशय दुर्दैवी निषेधार्ह आहे. हे वर्तन आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.
या सांस्कृतिक महोत्सवाचं निमंत्रण मला देखील होतं – ओमराजे निंबाळकर
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, या सांस्कृतिक महोत्सवाचा निमंत्रण मला देखील होतं. मात्र, त्याच दिवशी वडनेर या ठिकाणी चार व्यक्ती पुरात पाण्यात अडकली होती. अशा परिस्थितीत त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणं महत्त्वाचं होतं की त्यापुरातील लोकांना वाचवणे? आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. आज शेतकरी अडचणीत आहे त्याचे पंचनामे करणे गरजेचे आहे. त्याला तातडीची मदत मिळवून देणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण आपला वेळ सांस्कृतिक महोत्सवात वाया घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यात घालवला पाहिजे. हा सांस्कृतिक महोत्सव तुम्ही रद्द करा आणि त्याच्यामध्ये जो पैसा खर्च करणार आहात तो पैसा पुरग्रस्तांना द्या अशी मागणी देखील ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.










