• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धाराशिवचा नवा चेहरा! डॉ. प्रतापसिंह पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मतदार नाव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी सर्व पात्र पदवीधरांना आवाहन केले आहे की, “लोकशाहीत सजग आणि सुशिक्षित मतदारांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र पदवीधरांनी वेळेत आपली नोंदणी करून लोकशाही बळकट करावी.” असं प्रतापसिंह पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी पदवीधर मतदार संघासाठी प्रतापसिंहपाटील यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्यातील चेहरा मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. ०१ नोव्हेंबर २०२२ पूर्वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले किंवा तीन वर्षांची पदविका पूर्ण केलेले आणि मराठवाडा विभागात वास्तव्यास असलेले नागरिक या नोंदणीस पात्र आहेत.

नोंदणीसाठी संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म क्रमांक १८, पदवी प्रमाणपत्राची प्रत, पासपोर्ट साईज फोटो, तसेच ओळखपत्र (आधार कार्ड / मतदार कार्ड) जमा करावे लागतील. नावात बदल झाल्यास गॅझेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड सादर करणे आवश्यक आहे.

डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी सांगितले की, “पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी दरवेळी नव्याने तयार केली जाते. त्यामुळे मागील निवडणुकीत नाव नोंदवलेले असले तरी पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक आहे.”

शिक्षित समाजाने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी सर्व पदवीधरांना नोंदणी करून सक्रिय नागरिकत्वाचे भान राखण्याचे आवाहन ही डॉ.पाटील यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर; नगराध्यक्षपदावर कोण बसणार? वाचा संपूर्ण बातमी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दुर्दैवी घटना, दोन मुलांचा मृत्यू..

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दुर्दैवी घटना, दोन मुलांचा मृत्यू..

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share