• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय रणनीती आखणी


धाराशिव- जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका, आठ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून संघटित व शिस्तबद्ध मोहीम सुरू असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक प्रभाग व बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेऊन स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या पालिकेत त्यांनी केलेल्या कारभाराच्या त्रुटींचा व लोकांना येणाऱ्या स्थानिक अडचणींचा बारकाईने अभ्यास करून, विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची आखणी केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत ५५ जागा, आठ पंचायत समित्यांमध्ये ११० सदस्य आणि आठ नगरपालिकांमध्ये सुमारे १७५ जागा असून, या सर्व ठिकाणी भाजपने स्वबळावर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मित्रपक्षांसोबत युतीबाबत चर्चाही सुरू असल्याचेही कुलकंरी यांनी सांगितले.

तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा लाभ घेत जिल्ह्याच्या विकासाचा नवा आराखडा राबवण्याची तयारी पक्षाने पूर्ण केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात भाजपची पकड दिवसेंदिवस मजबूत होत असून, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनतेचा वाढता विश्वास पाहता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील, असा आत्मविश्वास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा, शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश! जनतेची ६० कोटींची बचत!
– आमदार राणाजगजीतसिंह पाटील

Next Post

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

Next Post

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share