शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या..
अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.. शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालंय, घराचं छप्पर पुराच्या लाटेत गडप झालं, संसार उद्ध्वस्त झाला, लेकरांच्या डोळ्यातलं भविष्य वाहून गेलंय, आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर ओसंडतोय ही करुण कहाणी प्रत्येक गावात आहे.. असं असतानाही सरकार अजून पंचनाम्याची वाट का पाहतंय? डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का? सरकार सरसकट मदत जाहीर करण्यात का मागेपुढे पाहतंय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला..
मी राजकारण करायला आलो नाही. पण तुमच्यावर अन्याय देखील होऊ देणार नाही. या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले नाही. आमची मागणी आहे की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आम्हाला हेक्टरी ५० हजार रुपये मिळाले पाहिजे. सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे. पिकविण्याचे निकष बदलले आहेत. आज माझ्या हातात काही नाही मी तुम्हाला धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.कृपा करून आत्महत्या करू नका हे वाईट दिवस जातील. खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आल्या आहेत. या सर्व नोटीसा मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून देऊ आणि त्यांना सांगू हे पैसे तुम्ही भरा. खचून जाऊ नका तुमच्या पाठीमागे तुमचा परिवार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या लढ्याच्या प्रत्येक पावलावर शिवसेना खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभी आहे असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला.. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, मा. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, मा. खा. चंद्रकांत खैरे, आ कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, मा. आ. दयानंद गायकवाड आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










