धाराशिव (प्रतिनिधी): आगामी धाराशिव नगरपालिका निवडणुका जोरात रंग घेत असताना वार्ड क्रमांक 18 मध्ये काँग्रेस पक्षाने निर्णायक पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या तिकिटावर सौ. उजमासबा अजहर पठाण या उमेदवारीसाठी उभ्या राहिल्याने प्रभागातील राजकीय वातावरणात उत्सुकता व चैतन्य पसरले आहे. या उमेदवारीमागे कार्यकर्त्यांची, स्थानिक नागरिकांची आणि विशेषतः अजहर पठाण यांच्या कामाची मजबूत पायाभरणी आहे. गेल्या काही वर्षांपासून अजहर पठाण यांनी वार्डातील विविध मूलभूत आणि सामाजिक गरजांवर सातत्याने काम करून लोकांचा विश्वास संपादित केला आहे.
वार्डातील उल्लेखनीय कामे :
वार्डातील मुख्य आणि उपरस्त्यांवर पथदिव्यांची उभारणी, ज्यामुळे नागरिकांना मिळाली सुरक्षितता
कब्रस्तानची साफसफाई व निगा राखण्याची जबाबदारी घेऊन स्वच्छ परिसर निर्माण
नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ प्रतिसाद देत, वैयक्तिक स्तरावर मदत
सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय पुढाकार
या सर्व कामांमुळे नागरिकांमध्ये पठाण परिवाराबद्दल चांगली भावना निर्माण झाली असून, त्याच विश्वासातून सौ. उजमासबा अजहर पठाण यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा मिळत आहे.
“जनताच आमचा जाहीरनामा” — अजहर पठाण यांची लोकप्रतिनिधिक घोषणा
अजहर पठाण यांनी बोलताना महत्वाचा संदेश दिला:
“या निवडणुकीत आम्ही कोणताही जाहीरनामा देणार नाही. जनतेने सुचवलेले काम हेच आमचा खरा जाहीरनामा असेल. लोकांनी सांगितलेले, लोकांनी मागितलेले प्रत्येक काम आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करू. आमच्यासाठी जनता हीच दिशा आणि जनता हीच ताकद आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रभागातील सामान्य मतदारांमध्ये विश्वास आणखी दृढ झाला असून, निवडणूक ‘वचनांपेक्षा कामांवर’ आधारित असल्याचा संदेश स्पष्ट झाला आहे.
वार्ड 18 मध्ये निवडणूक आणखी रंगणार
महिला नेतृत्व, काँग्रेसचे मजबूत संघटन आणि अजहर पठाण यांच्या कामाची वारसा परंपरा — या तिन्हींच्या प्रभावामुळे वार्ड 18 मधील निवडणूक वातावरण अधिकच गाजत असून नागरिकांमध्ये एकच चर्चा:
“उजमासबा पठाण यांच्यामुळे वार्डात विकासाला नवी दिशा मिळेल!” आगामी दिवसांत प्रचार मोहीम वेग घेणार असून, प्रभागात विकास, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कामांची चर्चा केंद्रस्थानी राहणार हे निश्चित.











