धाराशिव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या तब्बल 268 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी वाटप आणि कामे मंजूर करतांना गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले गेले होते.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांची स्थगिती उठवण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्या फेसबुकवर या संदर्भात माहिती दिली आहे.
“धाराशिव जिल्हा नियोजन समिती: २०२४-२५ च्या स्थगित शिल्लक निधी सह २०२५-२६ च्या निधीचा योग्य कामांसाठी वापरास मान्यता”. अशी पोस्ट आमदारांना राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली आहे.
या कामांवरील उठवण्यात आली स्थगिती?
पोलिस व तुरुंग या विभागाच्या आस्थापनेवरील पायाभुत सुविधा पुरविणेसाठी 14 कोटी, गतिमान प्रशासन व अपतकालिन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या 8 कामांना 1 कोटी 19 लाख, कार्यालयीन इमारती, शासकीय निवासी इमारती, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग, यांचेकडील विद्युत विषयक कामे (कार्यालयीन इमारती, ग्रामिण रुग्णालये, शासकीय निवासी इमारती इ.) साठी अश्या 95 कामांना 7 कोटी 18 लाख असे 106 कामावरील 22 कोटी रुपयांची स्थगिती उठवली आहे.











