• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

Azar Shaikh by Azar Shaikh
2026/05/13 01:28 am
0
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा पीकविमा 

​विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती 

​खरीप २०२५ हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकऱ्यांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने (STAC) फेटाळून लावल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ अंतर्गत आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत आहे. जिल्ह्यातील ५५ विमा युनिटमधील ३६८ पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने आक्षेप नोंदवून अपील केले होते. कंपनीचा दावा होता की, पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया नियमानुसार झालेली नाही. मात्र, धाराशिव जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप आधीच फेटाळण्यात आले होते. तरीही कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे (STAC) धाव घेतली होती. आपण स्वतः या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांची भेट घेतली. सिंग इतर राज्यातील निवडणूक कर्तव्यावर असतानाही शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. या सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळून लावत जिल्हा समितीने २२ डिसेंबर रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवला. परिणामी, कृषी आयुक्तालयाने आता पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकरी बांधवांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

​संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून, सर्वाधिक ४ लाख ४० हजार ४४ अर्जदारांनी सोयाबीनचा विमा उतरवला होता. यातील ४.०५ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळावे यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विमा कंपनीने तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत दिलेली स्थगिती आता उठली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच हा दिलासा मिळेल. बळीराजाला संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना ५२४ कोटींची मदत

केवळ पीकविमाच नव्हे, तर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या ७ लाख १३ हजार ८७१ शेतकरी बांधवांना शासनाकडून ५२४ कोटी ७८ लाख रुपयांची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाख ७५ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे. त्यानुसार ​जून महिन्यातील नुकसानीपोटी २२ लाख रुपयांची मदत (१०८६ लाभार्थी), जुलै-ऑगस्ट २०२५ मधील नुकसानीच्या मोबदल्यात १८९ कोटी ६१ लाख रुपये (२.३३ लाख लाभार्थी), ​सप्टेंबर २०२५ मधील नुकसानीचे २९२ कोटी ४९ लाख रुपये (४.०४ लाख लाभार्थी) तर

​सप्टेंबर महिन्यातील अतिरिक्त नुकसानीचे ४२ कोटी ४६ लाख रुपये (६३ हजार लाभार्थी) आपल्या महायुती सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात जमा केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Continue Reading
Previous Post

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Next Post

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

Azar Shaikh

Azar Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जिल्हा

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

जिल्हा

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

जिल्हा

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

जिल्हा

“माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन”, अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

जिल्हा

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

Next Post
अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share