उबाठाच्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली आहे. गेल्या आठवड्यात या विषयी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांची ऑनलाईन मिटिंग घेऊन वसुली करायची नाही अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असं भोसले यांनी म्हटलं आहे.
तरीदेखील जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ऑगस्ट महिन्यात आलेल्या नोटीस दाखवत संकटकाळात राजकारण करत आहेत.आमचा त्यांना सल्ला आहे तुम्ही ३६५ दिवस, २४ तास फक्त राजकारण करत असता किमान आपत्तीच्या काळात तरी जनतेच्या मदतीसाठी काम करा नौटंकी करत राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा, त्यांच्या संकटात पाठीशी उभे राहण्यात तुमची शक्ती खर्च करा.
खरी जनसेवा ही कृतीतून दिसते, नाट्यमय आंदोलनातून नव्हे. असेही नितीन भोसले म्हणाले. दरम्यान यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दरम्यान यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भोरे यांनी नितीन भोसले यांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्ज वसुलीच्या नोटीसा आताच्याच, शेतकऱ्यांना सुद्धा खोटं ठरवायचं पाप आता भाजप करतय असं युवासेना जिल्हा समन्वयक ऍड संजय भोरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं संजय भोरे यांनी काय दिलं प्रत्युत्तर?
भाजप काही दिवसांपासून अतिवृष्टी झालीच नाही असं म्हणाले तरी आश्यर्य वाटणार नाही. कारण नोटीसा जुन्या असल्याच मत भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी राणा पाटील यांच्या सांगण्यावरून व्यक्त केल. नोटीसा आताच्या काळातील आहेत. अगदी दोन चार दिवसापूर्वीच्या असूनही ते देखील मान्य करायच धाडस राणा पाटील यांच्यामध्ये नाही. जप्तीची कारवाई फडणवीस यांना थांबवण्यास सांगायची हिंमत राणा पाटील यांनी दाखवावी असे आव्हान युवासेना जिल्हा समन्वयक यांनी दिल आहे.





पुढे बोलताना, ऍड. भोरे म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटील व भाजप पक्ष शेतकरी विरोधी वागत आहेत की आता शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसावर देखील ते संशय व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना विरोध करून यांना नेमक काय साध्य करायच? भाजपवाले व राणा पाटील उद्या अतिवृष्टीच नव्हती असे देखील म्हनाले तर आश्चर्य वाटायला नको असं एकंदरीत यांचं वागण आहे. 19 सप्टेंबर रोजी बँकेने नोटीस तयार केली व शेतकऱ्यांना 26 सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्याचा पुरावा सादर केला आहे. त्यामुळं भाजपचा हा दावा कीती खोटा आहे हे ऍड. भोरे यांनी दाखवून देत भाजपचा चेहरा समोर आणला.











